विमा विमा शासनाचे नवे निकष; आता पिक विमा ‘या शेतकऱ्यांना’ मिळणार नाही Crop Insurance list 2025

Crop Insurance: उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार नाहीत तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

Crop Insurance list 2025

पिक विमा योजनेत नवीन बदल

अलीकडे राज्यात अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्ती आणि पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केलेले होते.

मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईसाठी जुनेच निकष लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या बैठकीच्या कार्यक्रमादरम्यान ही बाब समोर आलीय.

अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरीत फार बदल झालेला आहेत. कडक उन्हाळ्यात मध्येच आभाळ येते व पाऊसही पडतोय. पावसाळ्यात ढगफुटीसारखा धो-धो, अतिवृष्टी व संततधार पाऊस पडतो. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. हे प्रमाण वाढलेले आहे.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

पावसाळ्यात व कधीही पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके पाण्यात जातात आणि धान्य खराब होते. पीक काढून ठेवले तर पावसाने गाठले तरीही धान खराब होते. सध्या अतिवृष्टी व संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून बँक खात्यावर जमा केले जाते आहे.

मात्र शासनाने या दोन्हीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे, तर पीक विम्यापोटी नुकसानभरपाई द्यायची नाहीत, असा निर्णय घेतलेला आहे. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक नुकसानभरपाई विमा कंपनीला द्यावी लागणार आहेत.

केंद्र सरकारचे पीक कापणी प्रयोगावरती पीक नुकसानभरपाई देण्याचे निकष आहे, मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चाच नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या चार बाबींचा समावेश केलेला होता.

Crop Insurance

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

२०१६-१७ ते २९२३-२४ या ८ वर्षांत विमा कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटी रुपये हप्ता राज्य शासनाकडून दिलेला असून, शेतकऱ्यांना ३२ हजार ६५८ कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहेत. विमा कंपन्यांना १० हजार ५४३ कोटी नफा झालेला आहेत.

१ रुपयाचा पीक विमा बंद

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या १ रुपयात पीक विमा ही योजना गुंडाळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहेत. १ रुपयात पीक विमा भरायचा असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखांच्या पटीत वाढलेली होती. मात्र, आता रक्कम भरावी लागणार असल्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची हॅलो संख्येमध्ये आपोआप घट होणार आहे. १ रुपयात पीक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढलेली होती. ती नव्या निकषामुळे कमी होणार आहे. आणि या योजनेबद्दल झाल्यामुळे प्रत्यक्ष पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देखील घट झाल्याची दिसून येईल.

तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा

आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment