Hawaman Alert Today: राज्यभरामध्ये पुढील तीन-चार दिवसांमध्ये वादळी वाऱ्या सोबतच अवकाळी पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला असून राज्यातील काही भागांमध्ये गारपीटीच अंदाज देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
तसेच आजच (31 मार्च) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसात सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकण मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा सोबतच विदर्भामध्ये देखील ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत असून पुढील तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबतच हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारे काळजी घेण्याचे आव्हान देखील सध्या करण्यात येत आहे.
बीड, जालना, लातूर, नागपूर चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये सध्या वादळी वऱ्यासह पावसाची सुरुवात झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यासोबतच विदर्भामध्ये अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला असून मराठवाड्यामध्ये देखील पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज सकाळपासूनच राज्यात हवामानाचा मोठा बदल झालेला असून पुढील तीन-चार तासांमध्ये पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच जालना, धुळे, नंदुरबार आणि जळगाव मध्ये देखील ढगाळ वातावरण झालेल्या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.