बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; निकाल कुठे पाहता येणार? संपूर्ण माहिती  HSC Result Date Maharashtra

HSC Result Date Maharashtra: राज्यातील बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याविषयी राज्य शिक्षण मंडळांनी माहिती जाहीर केलेली आहे. तर मंगळवार पासून म्हणजेच 6 मे पासून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जाहीर केलेली असून या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in जाऊन आपला निकाल पाहू शकतात आणि प्रत डाउनलोड करू शकतात. दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती.

खालील वेबसाईटवर निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव आवश्यक असणार आहे. निकालानंतर काही आठवड्यामध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज देखील करता येणार आहे. तर जुलै ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. आणि त्याचा निकाल हा सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होणार आहे. अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

दहावीचा निकाल कधी लागणार?

दहावीचा निकाल देखील पुढील दोन आठवड्यामध्ये लागणार असल्याचे बोलले जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच की 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यामध्ये परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहेत. मात्र अजूनही मंडळाकडून निकाल अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही दरम्यान राज्य मंडळांनी 9 विभागीय मंडळमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतलेली आहे या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आलेले होते. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89 बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झालेली आहे.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment