IMD Wheather Report Today: हवामान खात्याने ( IMD ) वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे. आता हवामान खात्याने याबाबत नवीन अपडेट दिलेली आहे. पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जाहीर केलेला आहे. यामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटीसह वादळी वारे वाहणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितलेले आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यात तापमान हे 40° चा वर गेलेले आहे. त्यातच आता अवकाळी ढग दाटून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरात मधील अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालेल्या असून त्यामुळे हवामान खात्याने पुढचे 5 दिवस महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
बीड, अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
हे पण वाचा 👉 या महिलांना एप्रिल व मे महिन्याचे 3,000 रूपये एकत्र मिळणार;
भारतीय हवामानशास्त्रने विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान अंदाज वर्तवला आहे.
IMD Wheather Report Today
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 मे रोजी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. आता मुंबईमध्ये ढगाळ वातावरण झालेली असून सकाळी 5 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून दुपारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुजरात मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे काल जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामध्येच कमी दाब क्षेत्रामुळे 6 मे ते 10 मे पर्यंत ढगाळ वातावरण तयार होणार असून उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पाऊस येत असताना किंवा विजांचा कडकडाट होत असताना झाडांच्या खाली आश्रयाला थांबू नये अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आली आहे.