भारत – पाकिस्तान युद्ध तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द; UGC ने दिले स्पष्टीकरण Maharashtra School

Maharashtra School: देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे येत आहे. सध्या संपूर्ण देशात विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र अशा प्रकारचे सगळी परिस्थिती असताना सध्या सोशल मीडियावर युजीसी कडून सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. असा दावा करण्यात येत आहे. परंतु या दाव्या मागील व्हायरल सत्य नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.

नुकत्याच काय दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे लोकप्रिय पर्यटन स्थळावर हल्ला करण्यात आलेला होता. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळेच पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेच्या विरोधात भारतात तीव्र लाट उसळलेली होती.

संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आणि भारताने याच घटनेचा बदल म्हणून पाकिस्तान आणि पीओके तील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला केलेला.

आणि सध्या होत असलेले ड्रोन हल्ले यामुळे दोन्ही देशांमधील संबंध हे चांगलेच बिघडलेले आहेत. आणि अगदी युद्धाचे सावट पाहायला मिळत आहे. अशी सारी तणावाची परिस्थिती असताना सध्या देशभरात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

खरंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही तासात सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. या मेसेज मध्ये एक नोटीस सुद्धा आहे. या नोटीस मध्ये देशाच्या युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याकारणाने सर्व परीक्षा रद्द करण्यात आले आहेत असे परिपत्रक पसरले जात आहे.

यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये फारच संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली असून विद्यार्थ्यांनी पालक सध्या चिंतेत आलेले आहेत. मात्र यासंदर्भात यूजीसी कडून मोठे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती आज आपण भारत आणि पाकिस्तान यांच्या असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द झाले आहे का? याची माहिती पाहूयात.

यूजीसी ने काय सांगितलं?

भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरुवात असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. देशातील सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्यात आलेले आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने घरी परतण्याचा सल्ला देण्यात आलाय. असा तो मेसेज आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

मात्र सोशल मीडिया मधील या मेसेजमुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेल्या होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःच ( UGC )विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तात्काळ स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

आयोगाने सांगितल्याप्रमाणे सध्या सोशल मीडियामध्ये जी नोटीस व्हायरल होत आहे. ती पूर्णपणे बनावट असून युजीसी ने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलेले आहेत.

परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

तसेच यावेळी UGC विद्यार्थ्यांना अशी आवाहन केलेले आहे की, विद्यार्थ्यांनी यूजीसी अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्स वरच विश्वास ठेवावा. अशा सोशल मीडियामधील मेसेज वर विश्वास ठेवू नये.

याबरोबरच आयोगाकडून असे स्पष्टीकरण आलेले आहे. की देशात या प्रकारच्या अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार संपूर्ण देशात यूजीसी कडून परीक्षा होणार असल्याचे स्पष्टीकरण करून देण्यात आले आहे.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

भारत – पाकिस्तान युद्ध तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द; UGC ने दिले स्पष्टीकरण

Leave a Comment