पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला; पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ Opretion Sindoor On Pakistan Air Strike

Opretion Sindoor On Pakistan Air Strike:भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ( Opretion Sindoor ) सुरू केलेले आहे, ज्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढाईला एक नवीन आयाम मिळाला आहेत. या कारवाईत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केले आहे. रात्री 1:30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहे.

Opretion Sindoor On Pakistan Air Strike 50 दहशतवादी ठार चा दावा

सुरुवातीच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने या तळांना अचूक आणि काळजीपूर्वक लक्ष्य केलेले आहेत. दहशतवाद्यांना योग्य उत्तर देता यावे म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ चे नियोजन अतिशय धोरणात्मक पद्धतीने करण्यात आल्याची माहिती पीआयबीने दिलेली आहेत.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

लष्करी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही

पीआयबीने म्हटले आहे की, हवाई कारवाईदरम्यान पाकिस्तानच्या लष्करी सुविधांना हात लावण्यात आलेला नाहीये, त्यामुळे या कारवाईचा खरा उद्देश दहशतवादाचा नायनाट करणे आणि शेजारी देशासोबतचा संघर्ष वाढवणे हा नव्हता. याची खात्री करण्यात आलेली आहे. भारतातील कमी-अधिक 300 ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलच्या काही तास आधी हवाई दलाने हा हल्ला केलेला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ सर्व माहिती; युट्यूब व्हिडिओ पहा Opretion Sindoor

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

पीआयबीच्या म्हणण्यानुसार, पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर ही पावले उचलण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झालेला होता. लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहेत की, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाणार या वचनबद्धतेचे भारताने पालन केलेले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल अधिक माहिती सकाळी 10 वाजता दिली जा, असे पीआयबीने म्हटलेले आहेत.

पहलगाम हल्ल्याचा बदला हवाई दलाने घेतलेला आहे!

पहलगाममध्ये, दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर हल्ला केलेला होता, जिथे दहशतवाद्यांनी २६ जणांना गोळ्या घातल्या होत्या. ज्यामध्ये बहुतेक पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर भारताने गंभीर परिणामांचा इशारा दिलेला होता.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI