पुढील आठवड्यात राज्यात पावसाचं चित्र कसं असेल, कोणत्या भागांत जोरदार पाऊस पडणार आणि कुठे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, याबद्दल हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे पृष्ठभागीय तापमान सुमारे 30°C पर्यंत वाढले आहे. या उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असून मोठ्या प्रमाणावर ढग तयार होत आहेत. साबळे यांच्या अंदाजानुसार, हवामानातील कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यास, 25 जूनपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होईल. ज्या भागांमध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही, तिथेही लवकरच समाधानकारक पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
सोयाबीनचे टॉप 5 तणनाशक; तज्ञांकडून सल्ला
‘ला निना’चा प्रभाव: यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस?
प्रशांत महासागरातील इक्वाडोरजवळ पाण्याचे तापमान 22°C तर पेरूजवळ 17°C पर्यंत खाली आले आहे. यामुळे हिंदी महासागरातील वारे त्या दिशेने जाण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीत, यंदाच्या मान्सूनवर ‘ला निना’चा प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे साबळे यांनी म्हटले आहे.
२७ जूनपासून राज्यभरात दमदार पाऊस
सध्या महाराष्ट्रात उत्तर भागात हवामानाचा दाब 1002 हेक्टोपास्कल आणि मध्य भागात 1004 हेक्टोपास्कल आहे. पण, 25 जूनपासून हा दाब कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः 27 जून रोजी हा दाब सुमारे 1000 हेक्टोपास्कलपर्यंत खाली येईल, ज्यामुळे संपूर्ण राज्यात जोरदार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
या अंदाजानुसार, ज्या भागांमध्ये पावसाची कमतरता आहे, तिथेही 27 जूननंतर समाधानकारक आणि सतत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी या हवामान अंदाजानुसार आवश्यक ती काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांनीही योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फार्मर आयडी काढा; अन्यथा योजनांचा लाभ बंद होणार, नवीन यादी जाहीर