वसई : शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. हे वाक्य सत्यात उतरविले आहे. नायगाव पश्चिमेकडील एका 76 वर्षीय या आजोबांनी. गोरखनाथ मोरे (76) यांनी नुकतीच बारावीची परीक्षा 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण करून नवे उदाहरण समाजापुढे ठेवलेत. त्यांचे संपूर्ण वसई तालुक्यातून कौतुक होतेय.
गोरखनाथ मोरे हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्तीनंतर कन्या डॉ. आरती मोरे यांच्यासह ते सध्या नायगावला राहत आहेत. दहावी पास असलेल्या मोरे यांना शिकण्याची आवड असल्यामुळेच त्यांनी पुढील शिक्षणाची इच्छा मुलीसमोर व्यक्त केलेली. नायगाव येथील ऋषी वाल्मिकी ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भाटकर यांनी त्यांना मार्गदर्श करत, 17 क्रमांकाचा फॉर्म भरून घेतलेला होता.
नौदलातून सेवानिवृत्त, 76 व्या वर्षी आजोबांनी पुन्हा ठरवलं, आणि बारावी पहिल्याच प्रयत्नात पास, LLB ही करण्याचा ध्यास
तोंडी परीक्षा दिल्यानंतर, वसईतील न्यू इंग्लिश स्कुल आणि ज्युनियर कॉलेज या परीक्षा केंद्रावर जात त्यांनी परीक्षा दिलेली आहेत.आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झालेले आहे. त्यांना पुढे एलएलबी शिकण्याची इच्छा आहेत. यासाठी त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करत पहिले पाऊल टाकलेले आहे.
शिक्षण मंडळाकडून 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आलेली. गतवर्षीच्या तुलनेत बारावीची परीक्षा यंदा लवकर घेण्यात आलेली होती. सोमवारी दुपारी एक वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता आला आहे. अनेकांनी आपल्या मोबाइल तर अनेकांनी आपल्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन निकाल पाहिलेला आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींना पेढे भरवित आनंद व्यक्त केलेला आहे. निकालाची टक्केवारी यंदा काहीसी कमी झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी असे ५ जिल्ह्ये येतात. पाच जिल्ह्यातून 1 लाख 81 हजार 759 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यापैकी 1 लाख 79 हजार 904 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 961 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
उत्तीर्णतेची टक्केवारी 92.24 एवढीच आहेत. मागील वर्षी विभागाचा निकाल 94.08 टक्के होता. यंदा निकालात घसरण झालेली आहे. असे असले तरी राज्यभरातील ९ विभागांमध्ये छत्रपती संभाजीनगर चौथ्या क्रमांकावर आहेत. तर राज्याच्या एकूण निकालातही घसरण झालेली आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होतो. या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहेत. राज्यात निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहेत.