उद्या ‘या भागात’ अवकाळी पाऊस आणि वादळी वारे; एप्रिलमध्ये अवकाळी पावसाचे संकट

Rain Alert l भारतात एप्रिल (April)  महिन्यातच हवामानमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उत्तर भारतातील अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत असतानाच ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ १२ एप्रिलपर्यंत सक्रीय राहणार असून त्याचा परिणाम हवामानावर मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. (Rain Alert)

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अचानक हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, अनेक भागांमध्ये ‘रेड अलर्ट’ (red Alert)  जारी करण्यात आलेला आहेत. आयएमडीच्या अंदाजानुसार, या भागात येत्या दोन दिवसांत उष्णतेचा प्रकोप वाढणार आहे.

हे पण वाचा.! जि.प. शाळा बंद होणार? धोरण रद्द करण्याची मागणी अस्वस्थता वाढलीय: अनेक शाळांतील शिक्षक संख्या कमी

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

वादळ, अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट :

हवामान खात्याने म्हटलेलं आहे की, पश्चिम भारतातील राजस्थानच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार होणार असून, वादळासह हलक्याशा पावसाची शक्यता आहेत. त्याचबरोबर दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात गडगडाट वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. या हवामान बदलामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहेत. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून ते हळूहळू ईशान्य दिशेने सरकत आहेत. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही पावसाचा जोर जाणवेल.

Rain Alert l वाऱ्याचा वेग ५० किमी पर्यंत राहणार :

या प्रणालींच्या प्रभावामुळे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहेत. अनेक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा अनुभव नागरिकांना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. (Rain Alert)

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

१० ते १३ एप्रिल दरम्यान बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विशेषतः उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये १० आणि ११ एप्रिलला पावसाची तीव्रता वाढू शकतेय. (Weather update)

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment