11th Admission Process: दहावीच्या निकालात 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी पैकी एकूण 1,31,146 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामधील ज्या विद्यार्थ्यांना गुण पत्रिकेवर ‘जी’ असा शेरा आलेला आहे अशा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी साठी एटीकेटीतून प्रवेश घेता येणार नाही. पण गुणपत्रिकेवर ‘एच’ शेरा असलेले विद्यार्थी मात्र अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी अर्ज करताना 10 कॉलेज पसंती क्रमानुसार निवडावी लागणार आहेत. त्यानुसार त्यांना प्रवेश मिळेल. प्रवेश अर्ज करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने ही https://mahafyjcadmissions.in/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच विज्ञान, कला, व वाणिज्य शाखेमधून ऑनलाईन प्रवेश मिळणार आहेत. राज्यांमधील 17,000 हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी केलेली असून प्रत्येक विद्यार्थ्यास दहा 10 कॉलेज निवडून त्याच्या पसंती क्रम द्यावा लागणार आहे. याशिवाय दोन विषयांमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीतून प्रवेश मिळणार आहेत. पण त्यांच्या गुणपत्रिकेवर ’एच’ असा शेरा असणे बंधनकारक आहेत.
‘जी’ सेरा असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र जून जुलैमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. असे ज्यांना एटीकेटीतून प्रवेश घेतलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी साठी प्रयोग घेण्यापूर्वी दहावीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 19 मे पासून अकरावीचे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
- मूळ पत्रिका
- शाळा सोडल्याचा मुळ दाखला
- आधार कार्ड ची झेरॉक्स
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामाजिक आरक्षणांमधून प्रवेश अर्ज करणाऱ्याचा जातीचा दाखला
- आर्थिक दुर्बल घटकांमधून अर्ज करणाऱ्यांसाठी तहसीलदारांचे उत्पन्नाचा दाखला आवश्यक
इतर महत्त्वाच्या बाबी
- ऑनलाइन प्रवेश अर्ज दोन भागात भरावे लागणार आहेत दुसऱ्या भागामध्ये कॉलेजचा प्रवेश पसंतीक्रम टाकावा लागणार आहे.
- आरक्षणामधून 45% विद्यार्थी न मिळाल्यास त्या जागांवरती खुल्या प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
- प्रवेशाचे एकूण तीन फेऱ्या जाहीर केल्या जातील गरज भासल्यास विशिष्ट देखील जाहीर केली जाऊ शकते.
- दहा महाविद्यालयांचे पसंती कलम निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रवेश फेरी वेळी त्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नाही हे चेक करणे आवश्यक आहे.
- प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे सर्व मूळ कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक आहे.