नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघितलेल्या मान्सूनचा अखेर महाराष्ट्रात प्रवेश झालेला आहेत. रविवारी (२५ मे) हवामान खात्याने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली आहे. शनिवारी मान्सून केरळमध्ये पोहोचलेला होता. आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातही आलेला आहे. यंदा हवामान मान्सूनसाठी अनुकूल असल्यामुळे तो लवकरच राज्यात दाखल झालेला पाहायला मिळत आहे.
१२ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात
सामान्यता मान्सून ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात येत असतो. पण यंदा तो तब्बल १२ दिवस आधी आला आहेत. पुढच्या काही तासांत तो मुंबई आणि पुण्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहेत. आज सकाळपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांत आभाळ भरून आलेलं आहेत.
गोव्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावलेली आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहेत. म्हापसा भागात घरांत आणि दुकानांत पाणी शिरले आहेत. गोव्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहेत.
मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे
हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहेत. कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहेत. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही बंद झाला आहेत.
मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहेत. पावसावर अवलंबून असलेली खरीप शेती आता सुरू करता येणार आहे. उकाड्याने त्रस्त असलेल्यांनाही थोडा आराम मिळणार आहेत. मात्र चक्रीवादळाचा इशारा दिल्यामुळे रायगड आणि अलिबागमधील समुद्रकिनारे ओस पडलेले आहे. त्यामुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालेला आहेत.