Cyclone Shakti : शक्ती चक्रीवादळाचा फटका काही राज्यांना बसणार आहे. आणि महाराष्ट्र त्याचा काही परिणाम होणार आहे. याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या वादळाला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आलेले आहे. या वादळामुळे भारताच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतोय.
चक्रीवादळाचे स्थान आणि कालावधी
शक्ती चक्रीवादळ दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये पोहोचलेले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 ते 27 मे दरम्यान हे वादळ पूर्णपणे चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतेय.
चक्रीवादळाचा संभाव्य फटका
24 ते 26 मे या कालावधीत हे चक्रीवादळ ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच बांगलादेशातील खुलना आणि चितगाव या भागांच्या किनाऱ्यांवर धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहेत.
धोका असलेल्या राज्यांचा उल्लेख
शक्ती चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील खुलना भागाला बसू शकतोय. हवामान विभागाने या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केलेला आहेत. आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
हवामानातील बदल व संभाव्य परिणाम
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्यात 3 कमी दाबाच्या प्रणाली तयार होण्याची शक्यता आहेत. त्यापैकी एक प्रणाली चक्रीवादळाचे रूप धारण करेल अशी शक्यता आहेत. यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा निर्मिती होऊ शकतात अशी माहिती देण्यात येत आहे.
सावधगिरीचे आवाहन काय
हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन संस्थांना पूर्ण तयारीत राहण्यास सांगण्यात आलेले आहेत.