20 ते 25 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रभर देशभरातील 14 राज्यांमध्ये वातावरण मोठा बदल होणार असून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह देशातील 14 राज्यांमध्ये मोठ्या हवामान बदलाचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी वादळ, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवते आहे.
उष्णतेची लाट
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथे या हंगामातील सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्येही उन्हाचा जोर वाढला आहेत. विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिउष्णतेचा इशारा दिला आहे. 18 मार्चपर्यंत हा उन्हाचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे
पाऊस आणि वादळ
जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 20 ते 25 एप्रिल दरम्यान जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे 22 ते 25 एप्रिल दरम्यान 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळासह पाऊस पडणार आहे.
हवामानाचा परिणाम
कोकण, गोवा, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहणार आहेत.
दिल्लीतील हवामान मिश्र स्वरूपाचे असेल.
उत्तर भारतातील डोंगरी भागांमध्ये बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे.
नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
चक्रीवादळासह मुसळधार पाऊस; भारतातील 14 राज्यांमध्ये हवामान बदलणार! IMD चा इशारा जाहीर